अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

सत्ताधाऱ्यांचे यू-टर्न: ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन, आता पीककर्ज भरण्याचा आदेश!

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री हरिभाऊ पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, "आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू... कोरा... कोरा!"

    मात्र, सत्तेतील निर्णय वेगळेच निघाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मार्च २०२५ रोजी स्पष्टपणे सांगितले की, "३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरा... भरा... भरा!" यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.


शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप

    महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ भागातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत. दुष्काळ, अनियमित पाऊस आणि शेतीमालाच्या कोसळलेल्या किमतींमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या या निर्णयाने आणखी धक्का बसला आहे. राज्यातील शेतकरी संघटनांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला असून, निवडणुकीपूर्वी फक्त मतांसाठी आश्वासनांची खैरात केली गेली, असे बोलले जात आहे.


शेतकरी आत्महत्या आणि सरकारी निष्काळजीपणा

   महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक असून, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, सरकारने दिलेल्या आश्वासनांना पाठीशी घालून उलट पीककर्ज भरण्याचे आदेश देणे हा अन्याय असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.


सरकारविरोधात तीव्र संताप

   राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. शेतकरी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

   आता पाहावे लागेल की, शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता सरकार काही उपाययोजना करते की अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते!

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या