अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मळीचा टँकर थेट शेतकऱ्याच्या घरावर पलटी : नुकसान भरपाईची मागणी

 घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-रामसगाव रोडवरील घटना 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते रामसगाव रस्त्यावर मोठा अपघात घडला आहे. मळीने भरलेला टँकर (क्रमांक MH 04 FU 5420) शनिवारी, २९ मार्च रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजताच्या सुमारास थेट शेतकऱ्याच्या घरावर पलटी झाला. या घटनेत शेतकरी आकाश सखाराम हिवाळे यांच्या घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार, मळी भरून टँकर तीर्थपुरीहून रामसगावकडे जात असताना अचानक अनियंत्रित झाला आणि हिवाळे यांच्या शेतातील घरावर पलटी झाला. या अपघातामुळे घराचे छत आणि बांधकाम कोसळले, तसेच घरातील संपूर्ण साहित्यावर मळी पसरली. यामुळे घरगुती सामानासह शेतातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

     शेतकरी आकाश हिवाळे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. संबंधित कंपनीने किंवा वाहकाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या