घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने माजवले थैमान

 शेतकऱ्यांचे नुकसान



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     ३१ मार्च, सोमवार रोजी दुपार ते सायंकाळी बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये जोरदार पाऊस झाला, तर घनसावंगी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या.


    धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील तीर्थपुरी, खापरदेव हिवरा येथे जोरदार पाऊस झाला, तर शिंदे वडगाव येथे रिमझिम पावसाची नोंद झाली. एकलहेरा, पिठोरी सिरसगाव, आंतरवाली टेंभी, बाचेगाव, देवडी हादगाव, पाडोळी बुद्रुक येथेही पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळाला, मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

     बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी, मांजरसुंबा परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले. काही भागांत गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि इतर पिकांवर पावसाचा फटका बसला असून, शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिके ओलसर झाल्याने गंज लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, फळबागांवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला असून, आंबा, डाळिंब, केळी यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.


आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस अधिक त्रासदायक ठरत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.






Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या