अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने माजवले थैमान

 शेतकऱ्यांचे नुकसान



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     ३१ मार्च, सोमवार रोजी दुपार ते सायंकाळी बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये जोरदार पाऊस झाला, तर घनसावंगी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या.


    धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील तीर्थपुरी, खापरदेव हिवरा येथे जोरदार पाऊस झाला, तर शिंदे वडगाव येथे रिमझिम पावसाची नोंद झाली. एकलहेरा, पिठोरी सिरसगाव, आंतरवाली टेंभी, बाचेगाव, देवडी हादगाव, पाडोळी बुद्रुक येथेही पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळाला, मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

     बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी, मांजरसुंबा परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले. काही भागांत गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि इतर पिकांवर पावसाचा फटका बसला असून, शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिके ओलसर झाल्याने गंज लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, फळबागांवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला असून, आंबा, डाळिंब, केळी यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.


आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस अधिक त्रासदायक ठरत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.






Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या