अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

उपजिल्हाधिकाऱ्याचा छळ, हत्या कट आणि जादूटोण्याचा आरोप

 पत्नी, मेहुण्यासह तिघांना अटक



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांना पत्नी, तिच्या मित्राने आणि माहेरच्यांनी मिळून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, त्यासाठी अघोरी विद्येचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्नी, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला अटक केली आहे.


पत्नीच्या वर्तनामुळे सहनशीलतेचा अंत

   मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र कटके यांचा २००० साली सारिका कटके हिच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. काही काळ सर्व काही सुरळीत असताना नंतर सारिकाने कटके यांना अपमानास्पद वागणूक द्यायला सुरुवात केली. कटके अनुसूचित जातीतील असल्यामुळे त्यांच्यावर जातिवाचक टीका केली जात होती. तिच्या वागण्याचा उद्देश अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी अधिकारी बनण्याचा असल्याचे कटके यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, हे शक्य न झाल्याने ती अधिक आक्रमक झाली.


मध्यरात्री चॅटिंग आणि संशयास्पद वर्तन

    २०१५ साली दिवाळीच्या रात्री कटके यांनी पत्नीला कोणाशीतरी चॅटिंग करताना पाहिले. त्यांनी हा प्रकार तिच्या आई आणि भावाला सांगितला. त्यानंतर काही काळ परिस्थिती निवळली. मात्र, २०१९ साली कटके मुंबईत नोकरी करत असताना, पत्नी आणि मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्येच राहत होते. २०२१ मध्ये सारिकाने जालना जिल्ह्यातील बोरखडी येथे ग्रीनलँड स्कूल सुरू केले, जिथे विनोद उबाळे या मित्राचे हॉटेल होते.


अश्लील छायाचित्रे आणि अघोरी विद्या

    कटके यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आढळले. तसेच, विनोद उबाळे हा अघोरी विद्या जाणणारा असून, सारिकाच्या मदतीने त्याने कटके यांच्या जीवावर बेतणारा जादूटोणा केला. अघोरी विद्येच्या माध्यमातून कटके यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.


पोलिसांची कारवाई, तिघांना अटक

   या प्रकरणात विनोद उबाळे, पत्नी सारिका देवेंद्र कटके, सासू सुवर्णा साहेबराव देशमुख, मेहुणा आतिष देशमुख, घरातील कामगार छायाबाई बालाजी गायकवाड आणि शाळेतील कामगार संगीता (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सातारा पोलिसांनी विनोद उबाळे, सारिका कटके आणि आतिष देशमुख यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या