Posts

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

एसटी आरक्षणासाठी धनगर बांधवांचे जिल्हाभरात चक्का जाम

Image
आरक्षण व दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी तात्काळ मान्य करावी, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हाभरात धनगर बांधवांनी सोमवारी (१ ऑक्टोबर) मोठ्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. जालना येथे उपोषण करणारे प्रमुख आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात धनगर बांधवांची उपस्थिती होती. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.   अंबड, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राजनी, विरेगाव यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी आज सकाळीच धनगर समाजाच्या बांधवांनी संतप्त घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली. तीर्थपुरी येथील अंबड–तीर्थपुरी मार्गावरील डाव्या कालव्याच्या पुलावर आंदोलन केले. यावेळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनी वैशाली पवार यांना निवेदन सादर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.     धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेशाची अंमलबजावणी करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार फक्त आश्वासने देत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे, असा...

जालना - पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ !

Image
अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांची माहिती  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी जालना, अंबड, भोकरदन व परतूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पोलीस पाटील भरती-२०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.      मुळात अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या पूरपरिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करून प्रशासनाने अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलत २ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.      अर्जदारांनी आपले अर्ज ऑनलाईन माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सर्व परीक्षार्थ्यांना अर्ज करण्याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.     अर्जदारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे, अन्यथा अर्ज मान्य होणार नाही.

शशिकांत हातगल जालन्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

Image
उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना-आदेश जाहीर वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबत महत्त्वाचा आदेश दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केला आहे. प्रशासकीय कारणास्तव व सार्वजनिक सेवेच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.     शासन आदेश क्र. बदली-०९२५/प्र.क्र. २२३/९/आस्था-२ (ई-१३५२१०२) नुसार, उप जिल्हाधिकारी शशिकांत हातगल यांची उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जालना या पदावरून निवासी उप जिल्हाधिकारी, जालना या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.    संबंधित अधिकाऱ्यांनी २६ सप्टेंबर २०२५ पासून कार्यमुक्त होऊन नव्या पदावर तात्काळ रुजू व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सदरील आदेश उप सचिव महेश वरूडकर यांनी काढला आहे.     दरम्यान, शशिकांत हातगल यांनी यापूर्वी काही वर्षे अंबड येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले होते. त्यावेळी निवडणूक विभागात काम करत असताना त...

जालना अनुदान घोटाळा प्रकरणी पाच अधिकारी निलंबित

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शासकीय अनुदानाच्या वाटपात अनियमितता आणि घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत जालना जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. पी. एम. मिन्नू यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.     या निलंबनामुळे ग्रामपंचायत अधिकारी वर्गात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.     निलंबित अधिकाऱ्यांमध्ये घनसावंगी तालुक्यातील एस. जे. चांदणे (भेंडाळा), एन. डी. बरीदे (घाणेगाव), एस. पी. देवगुंडे (घोन्सी तांडा), डी. बी. नरळे (बाणेगाव) व एम. टी. रुपनर (गुरुपिंप्री) यांचा समावेश आहे. घोटाळ्याचा आरोप     जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशानुसार बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे अशी अपेक्षा होती. मात्र अनुदान वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकड...

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता वाढली

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्यावर दिसू लागला असून, २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांत ढगाळ हवामानासोबत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सूनच्या माघारीला अद्याप विलंब होणार असून, किमान ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून त्याचा निरोप होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.     दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारनंतर दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात हवामानात बदल होऊन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ व मराठवाड्यात आभाळी हवामान राहून हलक्या सरी कोसळू शकतात.     दरम्यान, दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाक...

जालना अनुदान घोटाळा प्रकरण : तलाठींना मदत करणारे कोतवाल व एजंट अटकेत

Image
  तीन आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाटपामध्ये तब्बल ₹२४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, जालना पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.      अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. आधीच महसूल अधिकाऱ्याला अटक     या प्रकरणात यापूर्वी सहाय्यक महसूल अधिकारी सुशिलकुमार दिनकर जाधव यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यानंतर तहसील कार्यालय, अंबड येथे कार्यरत तलाठी शिवाजी श्रीधर ढालके (रा. उमरी बाजार, ता. दर्यापुर, जि. अमरावती) यांना १९ सप्टेंबर रोजी अटक करून पीसीआर मध्ये ठेवण्यात आले आहे. तपासात ढालके यांनी त्यांच्या मूळ गावी उमरी बाजारातील ५० हून अधिक लोकांची नावे अंबड तालुक्याती...

अंबड- घनसावंगीत पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकीस्वाना लुटले

Image
  तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास; परिसरात भीतीचे वातावरण वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकी स्वरांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना आज २० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.     घनसावंगी तालुक्यातील रामसगाव फाट्याजवळ २० सप्टेंबर रोजी सकाळी चार अज्ञात भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून साडेगाव येथील शेतकरी रमेश बाबुराव खोजे यांना दोन दुचाकीवरील चार जणांनी अडवले तीर्थपुरीत खून झाला आहे, तुम्ही सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरत आहात? असे सांगून संशयितांनी खोजे यांच्याकडील दोन अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर त्या अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधल्या व आमच्या साहेबांना दाखवतो असा बहाणा करून दुसऱ्या पुडीत ठेवलेल्या नकली अंगठ्या देत खऱ्या अंगठ्या घेऊन आरोपी फरार झाले     या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस जमादार विष्णू चव्हाण यांनी दिली.      दरम्यान आजच गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या