अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना अनुदान घोटाळा प्रकरणी पाच अधिकारी निलंबित


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शासकीय अनुदानाच्या वाटपात अनियमितता आणि घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत जालना जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. पी. एम. मिन्नू यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

    या निलंबनामुळे ग्रामपंचायत अधिकारी वर्गात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

    निलंबित अधिकाऱ्यांमध्ये घनसावंगी तालुक्यातील एस. जे. चांदणे (भेंडाळा), एन. डी. बरीदे (घाणेगाव), एस. पी. देवगुंडे (घोन्सी तांडा), डी. बी. नरळे (बाणेगाव) व एम. टी. रुपनर (गुरुपिंप्री) यांचा समावेश आहे.

घोटाळ्याचा आरोप

    जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशानुसार बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे अशी अपेक्षा होती. मात्र अनुदान वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्राथमिक दोषी आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुढील कारवाई

    निलंबित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असून दोष सिद्ध झाल्यास पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या