घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारनंतर दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात हवामानात बदल होऊन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ व मराठवाड्यात आभाळी हवामान राहून हलक्या सरी कोसळू शकतात.
दरम्यान, दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामकाजात काळजी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. काढणी केलेली पिके व तुरीच्या शेतातील कडबा पावसापासून सुरक्षित ठेवावा, तसेच मळणीसाठी टाकलेला माल झाकून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामुळे, आधीच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक ठरणार आहेत. पिके, धान्य आणि जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment