घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अंबड- घनसावंगीत पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकीस्वाना लुटले

 तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास; परिसरात भीतीचे वातावरण


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकी स्वरांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना आज २० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.

    घनसावंगी तालुक्यातील रामसगाव फाट्याजवळ २० सप्टेंबर रोजी सकाळी चार अज्ञात भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून साडेगाव येथील शेतकरी रमेश बाबुराव खोजे यांना दोन दुचाकीवरील चार जणांनी अडवले तीर्थपुरीत खून झाला आहे, तुम्ही सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरत आहात? असे सांगून संशयितांनी खोजे यांच्याकडील दोन अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर त्या अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधल्या व आमच्या साहेबांना दाखवतो असा बहाणा करून दुसऱ्या पुडीत ठेवलेल्या नकली अंगठ्या देत खऱ्या अंगठ्या घेऊन आरोपी फरार झाले 

   या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस जमादार विष्णू चव्हाण यांनी दिली.

     दरम्यान आजच गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वडीगोद्री परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले असून आम्ही सिआयडी आहोत तुम्ही सोन्याच्या अंगठ्या कशाला घालून फिरता असे सांगून वरील प्रमाणेच लूट केली अशी माहिती मिळाली. या दोन्ही घटनेत तिन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या.

    दिवसाढवळ्या झालेल्या या लुटींमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर खात्री केल्याशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या