अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

 व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.

     धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे.


आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल

   मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र, नंतर त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे गमावले.

   वाढते नुकसान भरून काढण्यासाठी त्याने कर्ज घेण्यास सुरुवात केली. कुटुंब चालवण्यासाठी आणि ऑनलाइन गेममध्ये पैसे टाकण्यासाठी त्याने ओळखीच्या लोकांकडूनही कर्ज घेतले. मात्र, नुकसानच होऊ लागल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यातून तो मानसिक तणावात गेला.

पतीने घेतला टोकाचा निर्णय

    शनिवार रात्री किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मणने आधी पत्नी आणि लहान मुलाचा गळा घोटून खून केला असावा आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघड झाली, तेव्हा घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गावकऱ्यांचे दुःख – ऑनलाइन व्यसनाने बळी घेतला

    गावकऱ्यांनी सांगितले की, लक्ष्मण मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र काही काळापासून तो सतत मोबाईलमध्ये गुंतलेला दिसत होता. नंतर कळले की तो 'ऑनलाइन रम्मी' नावाच्या गेममध्ये पैसे लावून खेळत होता. कर्जबाजारी झाल्यानंतरही त्याने व्यसन सोडलं नाही आणि अखेर अशा भीषण टोकाला पोहोचला.

एक धोक्याचा इशारा – ऑनलाइन जुगाराच्या विळख्यातून बाहेर या!

    आज या घटनेनंतर सोशल मीडियावरून आणि गावकऱ्यांच्या वतीने एक कळकळीची विनंती केली जात आहे मित्रांनो, सुखाची अन् कष्टाची भाकर आयुष्यभर पुरते, पण जुगार, सट्टा, मटका, गुटखा हे सर्व तुमच्या आयुष्याचा शेवट करू शकतात. ऑनलाइन गेमच्या नादी लागू नका. नशा आणि व्यसनाचा शेवट नेहमीच अश्रू देतो.

पोलिस तपास सुरू

    घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण व कर्जाची रक्कम किती होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

   समाजाच्या पुढे एक मोठा सवाल उभा राहतो – मोबाईल आणि इंटरनेटच्या अति वापराने, विशेषतः ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात सापडलेल्यांना वेळेत जागृत करणं गरजेचं आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

  1. याबाबतीत सरकार आशा खेळावर बदी आणनार आहे का?

    ReplyDelete
  2. मुलांनी कुटुंबाचा विचार करावा सुरुवातीला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या