ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन विद्यार्थ्यांची MBBS मध्ये भरारी

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात यश संपादन करत ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि अढळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.


हर्षवर्धनने केली डॉक्टर होण्याच्या प्रवासाची सुरुवात

   घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील हर्षवर्धन शैलेंद्र पवार याने MBBS च्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत 68% मार्क घेतले आहेत. डॉक्टर होण्याच्या दिशेने पहिली पायरी पार केली आहे. बारावीनंतर त्याने CET आणि NEET च्या परीक्षांसाठी कठोर सराव केला. गत चार वर्षांपासून अखंड मेहनत घेत त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सर्व अडथळे दूर सारत आपले स्वप्न पूर्ण केले. व 1400 मार्क पैकी 948 एवढे मार्क (68 %) घेतले आहेत.


शेतकरी कुटुंबातील प्रशांतची यशस्वी स्वप्नपूर्ती

    घनसावंगी तालुक्यातील भादली येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत रामेश्वर नाईकनवरे याने २०२५ साली एमबीबीएस परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. त्याने अंतिम वर्षाच्या परीक्षेत ६१.५०% गुण मिळवत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला. या परीक्षेत त्याला १४०० पैकी ८६१ गुण मिळाले, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.


आदित्य मुकणेने मिळवले प्रथम श्रेणीमध्ये यश

   घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी भागवत मुकणे यांचा मुलगा आदित्य भागवत मुकणे यानेही MBBS परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.


ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण

   या ग्रामीण भागातील तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातही मोठे स्वप्न पूर्ण करता येते, हे सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!