ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात यश संपादन करत ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि अढळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील हर्षवर्धन शैलेंद्र पवार याने MBBS च्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत 68% मार्क घेतले आहेत. डॉक्टर होण्याच्या दिशेने पहिली पायरी पार केली आहे. बारावीनंतर त्याने CET आणि NEET च्या परीक्षांसाठी कठोर सराव केला. गत चार वर्षांपासून अखंड मेहनत घेत त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सर्व अडथळे दूर सारत आपले स्वप्न पूर्ण केले. व 1400 मार्क पैकी 948 एवढे मार्क (68 %) घेतले आहेत.
घनसावंगी तालुक्यातील भादली येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत रामेश्वर नाईकनवरे याने २०२५ साली एमबीबीएस परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. त्याने अंतिम वर्षाच्या परीक्षेत ६१.५०% गुण मिळवत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला. या परीक्षेत त्याला १४०० पैकी ८६१ गुण मिळाले, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.
घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी भागवत मुकणे यांचा मुलगा आदित्य भागवत मुकणे यानेही MBBS परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या ग्रामीण भागातील तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातही मोठे स्वप्न पूर्ण करता येते, हे सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
अभिनंदन
ReplyDelete