अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

समृद्धी साखर कारखान्याकडून उस नेण्यास पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप

 समृद्धी साखर कारखान्याकडून उस नेण्यास पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप 


  घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणी विषयी पक्षपाती करण्यात येत असल्याची दिसून येत आहे. तशी तक्रार जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

   ऊस तोड करताना प्रोग्राम नुसार व यादी जाहीर न करता. ऊस तोडण्यात येतो या बाबत कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता. ऊस तोडण्या संबंधी तुम्ही कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांना फोन लावा. त्यानंतरच तुमचा ऊस तोडल्या जाईल. असे सांगितले जाते यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यामुळे याचा राग मतदान न केल्याच्या संशयावरून शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यास चेअरमन सतीश घाटगे पिळवणूक करत आहे. तसेच वजन काट्यात हेरा-फेरी करून काटा मारण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांना दाट सशय आहे.


  दरम्यान कारखाना प्रशासनाने शेअर्सच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून डिपॉझिटची मागणी केली शेतकऱ्यांनी आपला ऊस हक्काने कारखान्याकडे जाईल म्हणून अनेक शेअर्स कारखान्याकडे जमा केले. वास्तविक शेतकऱ्यांची इच्छा नसताना तुमचा ऊस जाण्यास अडचण येईल म्हणून ऊस बिलातून कपात केली, कारखाना प्रशासनाचा अंदा-धुंद कारभार सुरू असून त्यांची सविस्तर चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे व माजी पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

  1. यांचाच राजकीय डाव आहे साहेबांना बदनाम करण्याचा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या