अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू एक गंभीर

 जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू एक गंभीर 


  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनेत दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले अशी मृतांची नावे असून, त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. तीन सख्खे भाऊ वाहिरा येथे आले होते, तेव्हा त्यांच्यावर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजय आणि भरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

  अंभोरा पोलिसांनी सात संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत, आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

   घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने तातडीने भेट देत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या