घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू एक गंभीर

 जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू एक गंभीर 


  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनेत दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले अशी मृतांची नावे असून, त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. तीन सख्खे भाऊ वाहिरा येथे आले होते, तेव्हा त्यांच्यावर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजय आणि भरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

  अंभोरा पोलिसांनी सात संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत, आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

   घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने तातडीने भेट देत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या