घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विवेक जॉन्सन (भा.प्र.से.) यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

     जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी केलेल्या आदेशानुसार, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचा या सुट्टीत समावेश आहे.

     ही कारवाई आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

      तथापि, १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मात्र या सुट्टीतून वगळण्यात आले आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयाने पालक, विद्यार्थी व शिक्षकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या