घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जालना जिल्ह्यात १५- १९ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट

 नागरिकांना दक्षतेचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांसाठी सूचना

1. मेघगर्जना व वीजा चमकत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे.

2. गडगडाटी वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये. विद्युतवाहक भागांपासून दूर रहावे. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल किंवा सायकल यांचा वापर टाळावा.

3. मोकळ्या मैदानात, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा अधांतरी लटकणाऱ्या तारांपासून दूर रहावे.

4. वीजा चमकत असताना मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून हात कानांवर ठेवावेत व डोके गुडघ्यात झाकावे, जमीनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा.

5. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे.

6. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाचे संरक्षण करावे.

7. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

आपत्कालीन संपर्क 

     जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे व विजेमुळे स्वतःचे तसेच जनावरांचे रक्षण करण्यासाठी दक्षता घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना – 02482-223132 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या