घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना जिल्ह्यात १५- १९ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट

 नागरिकांना दक्षतेचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांसाठी सूचना

1. मेघगर्जना व वीजा चमकत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे.

2. गडगडाटी वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये. विद्युतवाहक भागांपासून दूर रहावे. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल किंवा सायकल यांचा वापर टाळावा.

3. मोकळ्या मैदानात, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा अधांतरी लटकणाऱ्या तारांपासून दूर रहावे.

4. वीजा चमकत असताना मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून हात कानांवर ठेवावेत व डोके गुडघ्यात झाकावे, जमीनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा.

5. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे.

6. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाचे संरक्षण करावे.

7. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

आपत्कालीन संपर्क 

     जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे व विजेमुळे स्वतःचे तसेच जनावरांचे रक्षण करण्यासाठी दक्षता घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना – 02482-223132 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या