घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज मराठी ओमप्रकाश उढाण
ग्रामविकास विभागाने कळविले की, सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ या प्रकरणातील आदेशानुसार आधीचे आरक्षण रद्द करून नव्याने वाटप करण्यात आले आहे. ज्यांना पूर्वी आरक्षणाचा लाभ झाला नव्हता, अशा जिल्हा परिषदा आता या फेरवाटपात समाविष्ट झाल्या आहेत.
सर्वसाधारण (महिला) आरक्षण : ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आदी ११ जिल्हे.
अनुसूचित जाती (महिला) : बीड, अकोला, चंद्रपूर.
अनुसूचित जमाती (महिला) : अहिल्यानगर, वाशिम.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड.
तर उर्वरित जिल्ह्यांत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी अध्यक्षपदे राखीव ठेवली आहेत.
या नव्या आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक महिला नेत्यांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. कोल्हापूर, ठाणे, अमरावतीसारख्या ठिकाणी तर इच्छुक महिला कार्यकर्त्यांनी पदाच्या दाव्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपद हे स्थानिक राजकारणात महत्त्वाचे मानले जाते. निधी, योजना राबविण्याचे अधिकार, शैक्षणिक व आरोग्य विषयक निर्णयक्षमता या कारणांमुळे अध्यक्षपदावर सर्वपक्षीयांची नजर असते. महिला आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी विद्यमान महिला सदस्यांसह नव्या उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
सरकारच्या अधिसूचनेनुसार हे आरक्षण तत्काळ लागू होणार असून पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठीच लागू असेल. त्यानंतर पुन्हा आरक्षणाची फेरफार प्रक्रिया होणार आहे.
Comments
Post a Comment