अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात चारचाकी विहिरीत कोसळली

राजूर-टेंभुर्णी रस्त्यावर भीषण अपघात : मृतांचा आकडा वाढण्याची भीती


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      जालन्यात आज सकाळी एक भीषण अपघात झालाय यात चक्की चारचाकी गाडी विहिरीत कोसळली. राजूर-टेंभुर्णी रस्त्यावरील देळेगव्हाण-गाडेगव्हाण शिवारात आज (२९ ऑगस्ट) पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास एक चारचाकी कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. 

 या अपघातात किती जण मृत्युमुखी पडले याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसली तरी पाच जणांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई ( गुंगी ) ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील डकले परिवार हे वाहनातून जात होते. अर्धांगवायूग्रस्त रुग्णाला सुलतानपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याचे सांगितले जाते.

   घटनास्थळी पोलीस, तहसीलदार, तसेच स्थानिक प्रशासनाची यंत्रणा दाखल झाली असून क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या