घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

मराठा आरक्षणासाठी काहींची ठाम भूमिका–काहींची बोलती बंद!

 मंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे पाटील उपोषण करत असताना, राज्य सरकारच्या हालचालींना गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

      या बैठकीत उपस्थित राहून काही मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा आणि मनोजदादांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. तर काही मान्यवर बग्याच्या भूमिकेत दिसून आले असून काहींची बोलती बंद झाल्याचे चित्र दिसले.

    बैठकीत आंदोलकांच्या मागण्या या समाजाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्वरीत निर्णय घ्यावा, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी धरला.

    यात आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार विजयसिंह पंडित, आ संदीप सिरसागर यांनी मराठी आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तसेच झालेली अव्यवस्था याबद्दल तत्काळ निर्णय घ्यावा अशी विशेष मागणी केली.अशी माहिती मिळाली.

   त्याचबरोबर आझाद मैदान परिसरात उपोषणकर्त्या मराठा बांधवांना मूलभूत सोयीसुविधा – पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, वैद्यकीय सेवा व निवारा – प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी देखील बैठकीत मांडण्यात आली. आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार असून, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, असे मत या वेळी व्यक्त झाले.

    या बैठकीस ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. दादा भुसे, ना. बाबासाहेब पाटील, ना. मकरंद आबा पाटील, ना. माणिकराव कोकाटे आदी जन उपस्थित होत 

   बैठकीनंतर प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते. यामुळे आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांना थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या