घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या बैठकीत उपस्थित राहून काही मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा आणि मनोजदादांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. तर काही मान्यवर बग्याच्या भूमिकेत दिसून आले असून काहींची बोलती बंद झाल्याचे चित्र दिसले.
बैठकीत आंदोलकांच्या मागण्या या समाजाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्वरीत निर्णय घ्यावा, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी धरला.
त्याचबरोबर आझाद मैदान परिसरात उपोषणकर्त्या मराठा बांधवांना मूलभूत सोयीसुविधा – पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, वैद्यकीय सेवा व निवारा – प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी देखील बैठकीत मांडण्यात आली. आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार असून, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, असे मत या वेळी व्यक्त झाले.
या बैठकीस ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. दादा भुसे, ना. बाबासाहेब पाटील, ना. मकरंद आबा पाटील, ना. माणिकराव कोकाटे आदी जन उपस्थित होत
बैठकीनंतर प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते. यामुळे आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांना थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment