घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमावली २०२५ नुसार आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार—
आंदोलकांची संख्या कमाल ५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी साधने वा प्रचार यंत्रणा वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.
आंदोलनादरम्यान गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे.
लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना आंदोलनात सहभागी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे, कचरा टाकणे किंवा अन्य नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे.
आंदोलनासाठी येणाऱ्या वाहनांची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्री वेने वाडीबंदर जंक्शनपर्यंत आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदानात प्रवेश करू शकतील, तर इतर सर्व वाहने पोलीसांनी निश्चित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरातील नियोजित पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहेत.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ मधील अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे की, आंदोलनकर्त्यांनी नियमावलीनुसार घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा उच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला असून, लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन वा वाहतूक विस्कळीत होता कामा नये, असे नमूद केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदाटे यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान नमूद अटींचा भंग झाल्यास किंवा इतर कायद्याचे उल्लंघन केल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे आंदोलकांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment