अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

आझाद मैदान येथे आमरण उपोषणास परवानगी काय आहेत अटी



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून निघालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला अखेर मुंबईतील आझाद मैदान येथे सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील परवानगीपत्र आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केले आहे.

आंदोलनासाठी नियम व अटी

    महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमावली २०२५ नुसार आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार—

आंदोलकांची संख्या कमाल ५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.

आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी साधने वा प्रचार यंत्रणा वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.

आंदोलनादरम्यान गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना आंदोलनात सहभागी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे, कचरा टाकणे किंवा अन्य नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे.

वाहतूक व वाहनांची सोय

   आंदोलनासाठी येणाऱ्या वाहनांची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्री वेने वाडीबंदर जंक्शनपर्यंत आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदानात प्रवेश करू शकतील, तर इतर सर्व वाहने पोलीसांनी निश्चित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरातील नियोजित पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहेत.

न्यायालयीन आदेशांचा उल्लेख

    मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ मधील अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे की, आंदोलनकर्त्यांनी नियमावलीनुसार घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा उच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला असून, लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन वा वाहतूक विस्कळीत होता कामा नये, असे नमूद केले आहे.

पोलिसांचा इशारा

   वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदाटे यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान नमूद अटींचा भंग झाल्यास किंवा इतर कायद्याचे उल्लंघन केल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे आंदोलकांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या