घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

मल्टीस्टेट ठेवीदारांना केंद्र सरकारचा दिलासा

 ठेवीदारांच्या परतफेडीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्रातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमधील ठेवीदारांची व्यथा, त्यांचं दुःख आणि झालेली फसवणूक याविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. बीडपासून दिल्लीपर्यंत ठेवीदारांच्या न्यायासाठी लढा दिल्यानंतर अखेर या लढ्याला यश आलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत घोषणा केली अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली 

  यात ज्ञानराधा, जिजाऊ, शुभ कल्याण, जिजामाता आणि राजस्थानी या बहुराज्यीय पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड केली जाणार आहे. दीर्घकाळापासून आपल्या पैशासाठी झगडणाऱ्या ठेवीदारांना हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

  हे पाऊल ठेवीदारांच्या न्यायासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. आता लढ्याला दिशा मिळाली असून ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळणार, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार !

   ज्ञानराधासह बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे अडकले होते.

    याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा विषय सभागृहात मांडला याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत केंद्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.

   आज लोकसभेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत मोठी घोषणा करत पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या