घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
यात ज्ञानराधा, जिजाऊ, शुभ कल्याण, जिजामाता आणि राजस्थानी या बहुराज्यीय पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड केली जाणार आहे. दीर्घकाळापासून आपल्या पैशासाठी झगडणाऱ्या ठेवीदारांना हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.
हे पाऊल ठेवीदारांच्या न्यायासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. आता लढ्याला दिशा मिळाली असून ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळणार, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
ज्ञानराधासह बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे अडकले होते.
याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा विषय सभागृहात मांडला याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत केंद्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.
आज लोकसभेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत मोठी घोषणा करत पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
Comments
Post a Comment