अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मल्टीस्टेट ठेवीदारांना केंद्र सरकारचा दिलासा

 ठेवीदारांच्या परतफेडीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्रातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमधील ठेवीदारांची व्यथा, त्यांचं दुःख आणि झालेली फसवणूक याविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. बीडपासून दिल्लीपर्यंत ठेवीदारांच्या न्यायासाठी लढा दिल्यानंतर अखेर या लढ्याला यश आलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत घोषणा केली अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली 

  यात ज्ञानराधा, जिजाऊ, शुभ कल्याण, जिजामाता आणि राजस्थानी या बहुराज्यीय पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड केली जाणार आहे. दीर्घकाळापासून आपल्या पैशासाठी झगडणाऱ्या ठेवीदारांना हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

  हे पाऊल ठेवीदारांच्या न्यायासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. आता लढ्याला दिशा मिळाली असून ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळणार, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार !

   ज्ञानराधासह बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे अडकले होते.

    याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा विषय सभागृहात मांडला याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत केंद्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.

   आज लोकसभेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत मोठी घोषणा करत पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या