अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

चलो मुंबई साठी घनसावंगी तालुक्यातून १० हजार मराठा बांधवांची उपस्थिती

मराठा आरक्षण लढा:५०० गाड्या शेकडो दुचाकी जाणार


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

       मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई या आंदोलनात घनसावंगी तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभाग होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनासाठी तालुक्यातील ५०० वाहने व साधारणपणे ८ ते १० हजार मराठा बांधव मोटारसायकलसह सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 या आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघणार असून २९ तारखेला मुंबई गाठणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून सरासरी पाच गाड्या पकडल्या जाणार असून संपूर्ण तालुक्यातून किमान ५०० गाड्या व हजारो दुचाक्या मुंबईकडे निघतीलअशी माहिती मिळाली.

      घनसावंगी तालुक्यातील या आंदोलनासाठीची पहिली बैठक ३० जुलै रोजी भोगाव येथे झाली होती. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय मोठी बैठक घेण्यात आली. संपूर्ण तालुक्यातील पाच टीम कार्यरत असून जनजागृतीसाठी तीन प्रचार गाड्या अजूनही फिरत आहेत.

      घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, श्रीपत धामणगाव, लिंबी, मूर्ती, जांब समर्थ, भेंडाळा, गुंज बु., देवीदहेगाव, लिंबोनी, शिवणगाव, बोरांजणी, येवला, कंडारी परतूर, मासेगाव, जिरडगाव, राणी उंचेगाव, रवणा, पराडा, मंगु जळगाव, पानेवाडी, चापडगाव, भुतेगाव, दाई अंतरवाली, शेवगळ, तीर्थपुरी, मुरमा मंगरूळ, मुद्रेगाव, लींगशेवाडी, विठ्ठलनगर, बाणेगाव, भायगव्हाण, दहिगव्हाण, अंतरवाली टेंभी, रामसगाव, चापडगाव, भुतेगाव, शिंदे वडगाव आदी गावात बैठका झाल्या.

     सर्वांनीच आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही...एकच मिशन, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण,असा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला.

      या पार्श्वभूमीवर माऊली तालुक्यातील मुंबई बैठका व प्रचार गाड्या जनजागृती करत असून २७ ऑगस्टपासून मोठा मुंबई दौरा सुरू होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या