घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद च्या ५७ तर पंचायत समितीच्या ११४ जागांची प्रभाग रचना


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज (दि. २२) शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. यानंतर आता जालना जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीला अधिकृत वेग आला आहे.

    जालना जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी मिळून ११४ जागांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये 

भोकरदन : २२ जागा
जाफ्राबाद : १२ जागा
बदनापूर : १० जागा
जालना : १८ जागा
मंठा : १२ जागा
परतूर : १० जागा
घनसावंगी : १४ जागा
अंबड : १६ जागा

     या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी लावण्यात येणार आहे.

    निवडणूक प्रभागांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ग्रामस्थ, स्पर्धक उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी या प्रभाग रचनेचे बारकाईने अवलोकन करावे, असे आवाहन जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

  यामुळे जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता औपचारिक प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या