घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद च्या ५७ तर पंचायत समितीच्या ११४ जागांची प्रभाग रचना


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज (दि. २२) शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. यानंतर आता जालना जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीला अधिकृत वेग आला आहे.

    जालना जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी मिळून ११४ जागांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये 

भोकरदन : २२ जागा
जाफ्राबाद : १२ जागा
बदनापूर : १० जागा
जालना : १८ जागा
मंठा : १२ जागा
परतूर : १० जागा
घनसावंगी : १४ जागा
अंबड : १६ जागा

     या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी लावण्यात येणार आहे.

    निवडणूक प्रभागांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ग्रामस्थ, स्पर्धक उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी या प्रभाग रचनेचे बारकाईने अवलोकन करावे, असे आवाहन जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

  यामुळे जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता औपचारिक प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या