घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

प्रेमप्रकरणाच्या संशयातून निर्घृण खून!

 मृतदेह, डोक्याचे आणि मेंदूचे केले तुकडे तुकडे 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात रविवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधाच्या संशयातून मेव्हण्यानेच आपल्या मेहुण्याचा कोयत्याने सपासप वार करून निर्दयपणे खून केला.

      मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड (वय २६) असे असून, त्याच्यावर त्याच्याच मेव्हण्या अनिल चव्हाण याने धारदार शस्त्राने वार करून डोक्याचा अक्षरशः चुराडा केला. वार इतके क्रूर होते की मृतदेहाच्या डोक्याचे आणि मेंदूचे तुकडे झाल्याचे पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले.

       घटना रविवार रात्री सुमारे ११ वाजता, जळगव्हाण येथील रामनगर- वंसतनगर तांड्यात घडली असा अंदाज आहे. आरोपी गुन्हा करून फरार झाला असून, परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

    या अमानुष हत्येमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या