अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार

आज जलसाठा तब्बल ९५.०५ टक्क्यांवर


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

 

      पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर (उत्तर) पैठण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातील जलसाठा तब्बल ९५.०५ टक्के इतका झाला आहे.

        सध्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने, धरणातील पाण्याची पातळी जलप्रचलन आराखड्यानुसार (Reservoir Operation Schedule) नियंत्रित ठेवणे आवश्यक झाले आहे.
       त्यामुळे येणाऱ्या ४८ तासांत कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते, असे या कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयांना कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या