अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

महाराष्ट्रात पावसाचा कहर : अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही भागांना रेड अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीवर उंच लाटा, समुद्र खवळलेला आणि जोरदार वारे यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


रेड अलर्ट : मुसळधार पावसाचा इशारा

    मुंबई, रायगड जिल्हा तसेच पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑरेंज अलर्ट : सावधानतेचा इशारा

   पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतही मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असून, नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

समुद्र खवळलेला : उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रा (INCOIS) ने समुद्रकिनारी जिल्ह्यांसाठी विशेष इशारा दिला आहे.

मुंबई, उपनगर, ठाणे आणि रत्नागिरी येथे १८ ऑगस्ट रात्री ११.३० वा. ते २० ऑगस्ट रात्री ८.३० वा. दरम्यान ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटा येणार आहेत.

पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे १९ ऑगस्ट सकाळी ८.३० वा. ते २० ऑगस्ट रात्री ८.३० वा. दरम्यान ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे.

समुद्रात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असून, समुद्राची स्थिती अत्यंत खवळलेली राहणार आहे.

मच्छिमारांना सूचना

   समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांनीही किनाऱ्यावर न जाणे आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन सतर्क

    हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे आणि पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे असे सांगितले.

  नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या