घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जालना : ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

 मालवाहू ट्रॅक व ॲपे रिक्षाचा झाला अपघात 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील राजुर रोडवरील सुर्या लॉन्सजवळ आज रविवारी घडलेल्या भीषण अपघातात अॅपे रिक्षाला मालवाहू ट्रकने (क्र. आर जे ०१ जी बी ८४८६) जोरदार धडक दिली. या अपघातात अॅपे रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मयतांची नावे भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाराम बोरसे (वय ३५) आणि सुनिता नारायण वैद्य (वय ३६) अशी असून तिघेही बदनापूर तालुक्यातील मांडवा गावातील रहिवासी होते. ते जालन्याहून मांडव्याकडे अॅपे रिक्षाने जात असताना हा अपघात घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने अॅपेला जोराची धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

   या दुर्दैवी घटनेमुळे मयतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन हळहळ व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या