घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मयतांची नावे भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाराम बोरसे (वय ३५) आणि सुनिता नारायण वैद्य (वय ३६) अशी असून तिघेही बदनापूर तालुक्यातील मांडवा गावातील रहिवासी होते. ते जालन्याहून मांडव्याकडे अॅपे रिक्षाने जात असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने अॅपेला जोराची धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे मयतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन हळहळ व्यक्त केली.
Comments
Post a Comment