अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, तिथे राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रचंड हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील कार्यकर्त्याचा जीव गेला आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
विजयकुमार घोगरे हे मराठा आरक्षण लढ्यातील एक बिनीचे शिलेदार मानले जात होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने आणखी एक हिम्मतीचा मोती गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय वेदनादायी होत्या. निःशब्द... दुर्दैवी घटना... आणखी एक मोती गळून पडला,अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले.
Comments
Post a Comment