अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मुंबईत आंदोलनादरम्यान लातुरातील मराठा आंदोलकाचा मृत्यू

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लातुरातील एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. विजयकुमार घोगरे (रा. टाकलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय अशी माहिती हाती येत आहे.

   आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, तिथे राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रचंड हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील कार्यकर्त्याचा जीव गेला आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

       विजयकुमार घोगरे हे मराठा आरक्षण लढ्यातील एक बिनीचे शिलेदार मानले जात होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने आणखी एक हिम्मतीचा मोती गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय वेदनादायी होत्या. निःशब्द... दुर्दैवी घटना... आणखी एक मोती गळून पडला,अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या