घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

बीड महादेव मुंढे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू न्यायाची याचना करत आहेत! बैठकीत अश्रू अनावर

अन्यायाविरुद्धच्या लढ्याला नवी दिशा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      स्व. महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या होऊन तब्बल २१ महिने उलटून गेले, पण आजतागायत एका ही आरोपीला अटक झाली नाही, ही न्यायसंस्थेच्या आणि पोलिस यंत्रणेच्या गंभीर अपयशाची साक्ष ठरत आहे. या अन्यायाविरुद्ध न्यायाची याचना करत महादेव मुंडे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू आज संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख करत आहेत.

      आज १ ऑगस्ट रोजी बीड येथे सर्वपक्षीय, सर्वधर्मीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्व. महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

    मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय भावनिक शब्दांत व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. "मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदासाठी सह्याद्रीवरून वर्षा आणि वर्षावरून सह्याद्री करत येडे मारीत फिरणारे कुठे होते जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली?" असा रोषपूर्ण सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर कठोर टीका केली.

    तसंच, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांचा उल्लेख करत, “त्या अजूनही न्यायासाठी दारं ठोठावत आहेत. पण त्या एकट्या नाहीत – हा लढा त्यांच्या कुटुंबाचा नाही, हा लढा आपल्या सर्वांचा आहे!” अशी भावनिक हाक त्यांनी उपस्थितांना आणि संपूर्ण जनतेला दिली.

    बैठकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, "कुणाचीही मालमत्ता लुटली नाही, कुणावर जबरदस्ती केली नाही, पण अजूनही न्याय मिळत नसेल तर लोकांमध्ये असंतोष उफाळून येणारच." ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना उद्देशून दिलेल्या इशाऱ्यांमध्ये सांगण्यात आलं की, "लोक जर कायदा हातात घेतला तर तुम्ही रस्त्यावर थांबू शकणार नाही, हे लक्षात ठेवा."

    महादेव मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांची काळजी त्यांचे वृद्ध आई-वडील आणि पत्नी घेत आहेत. "रात्री अपरात्री काम करताना त्यांनी आपल्या लेकरांना वेळ दिला नाही, कारण त्यांना घराचा गाडा हाकायचा होता. पण आज त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय." अशी हळहळ व्यक्त झाली.

    या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परळी येथील लाभार्थींच्या समस्या एका महिन्यात १०० टक्के सोडवल्या जातील, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, हीच तत्परता न्याय मिळवण्यासाठी का दाखवली जात नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

   या संपूर्ण घटनाक्रमावरून हे स्पष्ट होतं की, आता हा लढा केवळ एका कुटुंबाच्या न्यायासाठी नाही – हा लढा व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्धचा आहे. आणि हा लढा संपूर्ण समाजाने एकजुटीने आणि ठामपणे लढला पाहिजे, अशी ठाम भूमिका या बैठकीतून पुढे आली.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या