अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

खासगी मोबाईलवरून ई-चलान कारवाईस बंदी- पोलीस महासंचालकांचे स्पष्ट निर्देश

फक्त अधिकृत प्रणालीच वापरण्याचे आदेश


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      वाहतूक पोलिसांनी ई-चलान कारवाई करताना खासगी मोबाईलचा वापर टाळावा आणि फक्त शासनाने मंजूर केलेल्या अधिकृत रीअल टाइम मोबाईल चालान प्रणाली चाच वापर करावा, असा स्पष्ट आणि ठोस आदेश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिला आहे.

परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

       परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे वाहतूक संदर्भातील उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ई-चलान प्रक्रियेसंबंधी येणाऱ्या तक्रारी, गोपनीयतेचा प्रश्न आणि मोबाईल वापराच्या अनधिकृत बाबींवर चर्चा झाली. नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये, तसेच भविष्यात कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश देण्यात आले.

 प्रमुख निर्देशांचे ठळक मुद्दे

1. ई-चलान करताना खासगी मोबाईल वापरण्यास बंदी

कोणत्याही परिस्थितीत वाहतूक पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांनी स्वतःच्या मोबाईलवरून फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नयेत.

2. फक्त अधिकृत रिअल टाइम मोबाईल चालान प्रणालीचा वापर

     शासनाने मंजूर केलेली आणि अधिकृतपणे कार्यरत असलेली रिअल टाइम मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरूनच सर्व ई-चलान प्रक्रिया पूर्ण करावी.

3. नियमभंग केल्यास शिस्तभंगात्मक कारवाई

    या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस अधिकारी/अंमलदारांविरुद्ध प्रशासनाकडून शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.

गोपनीयतेचा मुद्दा महत्त्वाचा

    ई-चलान कारवाईदरम्यान काही अधिकाऱ्यांकडून खासगी मोबाईल वापरण्यात येतो, ज्यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशा पार्श्वभूमीवर हे आदेश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहतूक पोलिसांसाठी लागू असून, कारवाईतील पारदर्शकता आणि शिस्तबद्धता राखण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

    एकंदरीतच वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करताना शासनमान्य पद्धतींचे काटेकोर पालन हेच विश्वासार्हता व कायदेशीर पारदर्शकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक वाहतूक कर्मचाऱ्याने या निर्देशांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या