अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंबडमध्ये भीषण अपघात : ट्रक व दुचाकीच्या धडकेत आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू

 अंबड पोचोड रस्त्यावर हृदयद्रावक घटना – जावयाच्या वर्षश्रधाहून परतताना काळाचा घाला !


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     अंबड शहरालगत असलेल्या अंबड-पोचोड रस्त्यावर सोमवारी एक भीषण अपघात घडला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

   मयतांमध्ये गोपिका रामभाऊ वाघ (वय 50, रा. डावलवाडी ता पैठण) आणि विशाल कृष्णा पवार (वय 1 वर्ष) यांचा समावेश आहे. या अपघातातील दुचाकी (क्रमांक MH20 DX 3756) ही दुचाकी लखन प्रकाश गायकवाड चालवत डावलवाडी येथून येत होता. मयत गोपिका वाघ या आपल्या जावयाच्या वर्षश्रद्धेचा कार्यक्रम उरकून नातवाबरोबर घरी परतत होत्या. त्याचवेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

    या अपघातात विशाल पवार या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर आजी गोपिका वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

    या घटनेने संपूर्ण डावलवाडी परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील दोन जणांचे अपघाती निधन झाल्याने गावावर दु:खाचे सावट आहे. अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या