अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बीड पुन्हा हादरले! प्रेमसंबंधातून तरुणाचा मारहाणीत मृत्यू

अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा अमानुष मारहाणीत मृत्यू

गेवराई तालुक्यातील गंगावाडीतील हृदयद्रावक घटना – पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, खुनाचा गुन्हा वाढवण्याची शक्यता


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रेमसंबंधामुळे एका तरुणाचा जीव गमावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे एका अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा काही नातेवाईकांनी अमानुष मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शिवम चिकणे याचा मृत्यू – प्रेमसंबंध ठरले घातक

    शिवम काशिनाथ चिकणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो माजलगाव येथे अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याचे आपल्या गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. मात्र यावेळी अचानक तिचे नातेवाईक घरी पोहोचले. त्यावेळी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली.

रस्त्यात गाठून अमानुष मारहाण

    विवादानंतर संतप्त नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठले व लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली. असा आरोप होत आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचे सांगितले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत.

पोलिस कारवाई – एकाला अटक, चौघांचा शोध सुरू

    या प्रकरणी गंगावाडी गावात खळबळ उडाली आहे. तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी भेट दिली. मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. तलवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, मात्र आता शिवमचा मृत्यू झाल्याने खुनाचा कलम (कलम ३०२) वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या