घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या प्रकरणाचा सूत्रधार गणेश ज्ञानेश्वर मोरे हा विठ्ठलवाडी (ता. अंबड) येथील असून एका सहकारी बँकेत व्यवस्थापक आहे. त्यानेच आपल्या काका बाबासाहेब अशोक मोरे (३८, विठ्ठलवाडी), संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३५, जामखेड), आणि बळीराम ऊर्फ भैया महाजन यांना या कटात सहभागी करून घेतले. आरोपींनी एक सेकंड हँड सैंट्रो कार (एमएच २० बीएन २३९९) खरेदी केली व तिच्यावर बनावट नंबरप्लेट लावली. तसेच आरोपी व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे संवाद साधत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सारा हिचे आजोबा हे जामखेड (ता. अंबड) येथील असून, शहरात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. जामखेड व विठ्ठलवाडी येथे त्यांची जमीन आहे. त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणारा नवनाथ चेडे याच्या माध्यमातून आरोपींना मुलीबद्दल माहिती मिळाली होती. सर्व आरोपी पीडित कुटुंबाला ओळखत होते. त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत आरोपींनी साराच्या अपहरणाचा कट रचला होता.
दि. १७ जुलै रोजी सायंकाळी सारा क्लासमधून बाहेर पडताच आरोपींनी तिला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या धैर्यपूर्ण प्रतिकारामुळे आणि तिच्या ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे आरोपींचा कट फसला. आरोपींची कार एका गल्लीत अडकली, त्यानंतर ते तिला न नेताच पळून गेले. काही वेळातच पोलिसांनी (एमएच २० बीएन २३०० या बनावट क्रमांक असलेल्या) कार जप्त केली. इंजिन आणि चेसिस नंबरद्वारे खऱ्या मालकाचा शोध घेऊन कारचा तपास १५ दिवसांपूर्वी झाल्याचे निष्पन्न झाले. कार विकत घेणारा गणेश मोरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाला वेग आला.
पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने अंबड-पाचोड रोडवरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथून बाबासाहेब मोरे व संदीप पवारला अटक केली. गणेश मोरे व भैया महाजन मात्र अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी १० विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. दोन्ही अटक आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेपूर्वी ४ फेब्रुवारीला बिल्डरपुत्र चैतन्य तुपे याचे अपहरण झाले होते. तेव्हाही जालना जिल्ह्यातील आरोपींचा सहभाग होता. दोनही प्रकरणांतून जालना जिल्ह्यातून येणाऱ्या गुन्हेगार टोळ्यांचे शहरात वाढते प्रमाण स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी व रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे (पुंडलिकनगर), संभाजी पवार (गुन्हे शाखा), सायबर निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, विशाल बोडखे, संदीप शिंदे, नवनाथ पाटवदकर, प्रशांत मुंढे, अर्जुन कदम, सुनील जाधव आदींनी तपास चक्रे फिरवली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
आरोपींनी २० दिवस केले होते रेकी
बँक मॅनेजरच होता मास्टरमाइंड
दोघांना अटक, दोघे अजूनही फरार
झटपट श्रीमंतीसाठी गुन्हेगारीचा मार्ग
पोलिसांची तत्पर कारवाई आणि सायबर तपासामुळे कट उधळला
Comments
Post a Comment