घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या आदेशानुसार, मा. सर्वोच्च न्यायालयाने ०६ मे २०२५ रोजी पारित केलेल्या निर्णयानुसार कार्यकाळ संपुष्टात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत म्हणजेच विहित कालावधीत पार पाडणे अनिवार्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाने खालील प्रमाणे निवडणूकपूर्व नियोजनासाठीचे आदेश आणि कार्यक्रम जारी केले आहेत
1. ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांची सदस्य संख्या व प्रभाग रचना आदेश
2. जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गण आणि सदस्य संख्या निश्चितीची अधिसूचना
3. प्रभाग रचना अधिकारांचे प्रत्यायोजन आदेश
4. प्रभाग रचना कार्यक्रम / वेळापत्रक
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशानुसार विहीत मुदतीत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंचायत समिती ग्रामीण लोकसंख्या (2011) , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,जिल्हा परिषद जागा , पंचायत समिती जागा
भोकरदन २८२३६९ ३६८६९ १२१९५ ११ २२
जाफराबाद १४७२१० २६२८९ ३६६६ ६ १२
जालना २३३४४१ ३६८६४ ३३०४ ९ १८
बदनापूर १४१९०३ २१०८४ १९६० ५ १०
अंबड २२४१५६ २७९९५ ४९६३ ८ १६
घनसावंगी १९३४३६ २६०९० ३४०४ ७ १४
परतूर १४१७०६ १८९२५ १७०२ ५ १०
मंठा १४५४२२ २३९०६ ३७८९ ६ १२
एकूण १५०९६४३ २१८०२२ ३४९८३ ५७ ११४
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभाग रचना, निवडणूक क्षेत्र निश्चिती आणि त्यासाठीचे नियोजन लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पारदर्शक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
Comments
Post a Comment