घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

पंढरपूरला पायी निघालेल्या अंबड तालुक्यातील वारकऱ्याचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीत सहभागी झालेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील एक वारकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना सोमवारी घडली.

      मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लिंबाजी पाटील (वय ५५) हे वारकरी संप्रदायातील निष्ठावान भक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाणाऱ्या माऊलीच्या दिंडीत नियमितपणे सहभागी होत असत. यंदाही पंढरपूरच्या दिशेने दिंडीत सहभागी होऊन ते मार्गस्थ होते.

     सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेपुते पाटी या ठिकाणी दिंडी सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित वारकऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

     या घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी थेट नातेपुते येथे पोहोचले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मूळगाव रोहीलागड येथे मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. पाटील कुटुंबीयांवर ही अपूरणीय दुःखाची वेळ कोसळली असून परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी कुटुंबीयांना धीर दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या