घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

पंढरपूरला पायी निघालेल्या अंबड तालुक्यातील वारकऱ्याचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीत सहभागी झालेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील एक वारकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना सोमवारी घडली.

      मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लिंबाजी पाटील (वय ५५) हे वारकरी संप्रदायातील निष्ठावान भक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाणाऱ्या माऊलीच्या दिंडीत नियमितपणे सहभागी होत असत. यंदाही पंढरपूरच्या दिशेने दिंडीत सहभागी होऊन ते मार्गस्थ होते.

     सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेपुते पाटी या ठिकाणी दिंडी सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित वारकऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

     या घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी थेट नातेपुते येथे पोहोचले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मूळगाव रोहीलागड येथे मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. पाटील कुटुंबीयांवर ही अपूरणीय दुःखाची वेळ कोसळली असून परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी कुटुंबीयांना धीर दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या