घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

आषाढी वारीत दुर्दैवी घटना: अंबड तालुक्यातील युवक नदीत बुडाला !

संत तुकाराम महाराज पालखी दिंडीतला युवक निरा नदीत बुडाला; माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतली घटनास्थळी भेट


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी क्रमांक १२ अंतर्गत सहभागी असलेल्या गोविंद कल्याणराव फोके (वय अंदाजे १७) या युवकाचा निरा नदीत बुडाल्याची घटना आज मंगळवारी घडली.



   गोविंद फोके हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून, तो आपल्या आजीबरोबर मस्के महाराज दिंडी क्रमांक १२ सोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाला होता. सराटी पुलाजवळील निरा नदीत आंघोळीसाठी उतरलेला असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

माजीमंत्री राजेश टोपे यांची भेट 

      या संपूर्ण घटनेची दखल घेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून शोधमोहीम तातडीने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

     सध्या परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, पोलीस व स्थानिक स्वयंसेवक युवकाचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेमुळे संत तुकाराम महाराज पालखीतील व सर्वच वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    मात्र ४:३० वाजेपर्यंत पोलिस व ग्रामस्थ सोडता इतर आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दाखल झालेले नव्हते अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली.

    दरम्यान पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे युवा व युवती तसेच सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिंडीत जाणाऱ्या भाविक भक्तांनी पाणी, रस्ता, वाहतूक, आपली वाहने, नदी आदी ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या