घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
गोविंद फोके हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून, तो आपल्या आजीबरोबर मस्के महाराज दिंडी क्रमांक १२ सोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाला होता. सराटी पुलाजवळील निरा नदीत आंघोळीसाठी उतरलेला असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
या संपूर्ण घटनेची दखल घेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून शोधमोहीम तातडीने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. 
सध्या परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, पोलीस व स्थानिक स्वयंसेवक युवकाचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेमुळे संत तुकाराम महाराज पालखीतील व सर्वच वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मात्र ४:३० वाजेपर्यंत पोलिस व ग्रामस्थ सोडता इतर आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दाखल झालेले नव्हते अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली.
Comments
Post a Comment