घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात दुर्दैवी घटना: पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

 जांभूळ खाण्यासाठी गेले अन् परत आलेच नाही...


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालन्यात आज एक दुर्दैवी घटना समोर आलीय यात गावाजवळील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.

    जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावाजवळ असलेल्या एका नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    मृत्यू झालेल्या मुलांची नावे कुणाल राहुल खरात (वय १० वर्षे) आणि युवराज गौतम खरात (वय ९ वर्षे) अशी असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी निघताना घरच्यांना जांभळं खाण्याचा बहाणा दिला होता. त्यानंतर त्यांनी गावाजवळ असलेल्या एका लहानशा तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पोहता न आल्याने ते पाण्यात बुडाले.

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. कुणाल आणि युवराज हे दोघे सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास गावालगतच्या ओढ्यात मृत अवस्थेत तरंगताना आढळून आले. त्यावेळी उपस्थित असलेले सर्व गावकरी, कुटुंबीय आणि नातेवाईक यांना शोक अनावर झाला.

    या घटनेबाबत राजेंद्र भिमराव खरात यांनी पोलिस ठाण्यात तोंडी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दुपारी सुमारे ४ वाजता त्यांना गौतम दगडू खरात यांचा फोन आला आणि युवराज व कुणाल हे त्यांच्या घरी आले आहेत का, अशी विचारणा झाली. त्यानंतर शोध घेऊन ओढ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या