ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात दुर्दैवी घटना: पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

 जांभूळ खाण्यासाठी गेले अन् परत आलेच नाही...


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालन्यात आज एक दुर्दैवी घटना समोर आलीय यात गावाजवळील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.

    जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावाजवळ असलेल्या एका नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    मृत्यू झालेल्या मुलांची नावे कुणाल राहुल खरात (वय १० वर्षे) आणि युवराज गौतम खरात (वय ९ वर्षे) अशी असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी निघताना घरच्यांना जांभळं खाण्याचा बहाणा दिला होता. त्यानंतर त्यांनी गावाजवळ असलेल्या एका लहानशा तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पोहता न आल्याने ते पाण्यात बुडाले.

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. कुणाल आणि युवराज हे दोघे सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास गावालगतच्या ओढ्यात मृत अवस्थेत तरंगताना आढळून आले. त्यावेळी उपस्थित असलेले सर्व गावकरी, कुटुंबीय आणि नातेवाईक यांना शोक अनावर झाला.

    या घटनेबाबत राजेंद्र भिमराव खरात यांनी पोलिस ठाण्यात तोंडी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दुपारी सुमारे ४ वाजता त्यांना गौतम दगडू खरात यांचा फोन आला आणि युवराज व कुणाल हे त्यांच्या घरी आले आहेत का, अशी विचारणा झाली. त्यानंतर शोध घेऊन ओढ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!