घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

एसटी पास थेट शाळेत : १६ जूनपासून राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा

 एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजना..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १६ जूनपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव योजना राबविणार आहे – ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’. या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळवण्यासाठी आगार कार्यालयात धावपळ करण्याची गरज भासणार नाही. एसटीचे पास थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित केले जाणार आहेत.

   परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमामुळे वेळ आणि श्रम वाचणार असून विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे अधिक भर राहील.

   या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसटी महामंडळाच्या सर्व आगार व्यवस्थापकांना आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून पाससाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती आगोदरच संकलित होऊन पास वाटप सुलभपणे करता येणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य फायदे

विद्यार्थ्यांना आगारात जाऊन रांगेत उभे राहावे लागणार नाही.

शाळा/महाविद्यालयातच पास मिळणार असल्याने वेळ वाचणार.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त.

शाळा व एसटी यामधील समन्वय अधिक बळकट होणार.

 राज्य परिवहन विभागाने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही योजना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या