अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात शेतकऱ्याच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी भव्य निदर्शने आंदोलन

 जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला भव्य निदर्शने आंदोलन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    हा शेतकरी घनसावंगी तालुक्यातील असून काल जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या असताना घडली. या वेळी घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्ह्यातील २६ तलाठ्यांनी केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यावर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तो शांततेत उभा होता. मात्र, पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत धमकावत, जमिनीवर ढकलून दिले आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

    या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीत नागरिकांना निवेदन देण्याचा हक्क असूनही, पोलिसांकडून शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास अनेकांनी निषेध नोंदवला आहे. "साहेब, शेतकऱ्याची कॉलर धरली, हरकत नाही… गोळ्या नाही घातल्या, त्याबद्दल उपकार मानतो," अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथेला वाचा फोडली आहे.

   या घटनेवर प्रतिक्रिया देताना शेतकरी म्हणाले, "सरकारला आमचं काही देणंघेणं नाही. आम्ही संवैधानिक मार्गाने निवेदन दिलं तरी आमच्यावरच अन्याय. तलाठ्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला, आणि आमच्यावर पोलिसांचा अन्याय – हीच सत्तेची विकृती आहे."या संपूर्ण प्रकारातून केवळ एका शेतकऱ्याचा नव्हे, तर संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान झाला आहे. लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या या घटनेविरोधात एकजुटीने आवाज उठवणे आवश्यक आहे, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे.

   १६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्व शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा पुन्हा एकदा जोरदार आग्रह करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या