ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
हा शेतकरी घनसावंगी तालुक्यातील असून काल जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या असताना घडली. या वेळी घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्ह्यातील २६ तलाठ्यांनी केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यावर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तो शांततेत उभा होता. मात्र, पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत धमकावत, जमिनीवर ढकलून दिले आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीत नागरिकांना निवेदन देण्याचा हक्क असूनही, पोलिसांकडून शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास अनेकांनी निषेध नोंदवला आहे. "साहेब, शेतकऱ्याची कॉलर धरली, हरकत नाही… गोळ्या नाही घातल्या, त्याबद्दल उपकार मानतो," अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथेला वाचा फोडली आहे.
१६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्व शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा पुन्हा एकदा जोरदार आग्रह करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment