ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात शेतकऱ्याच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी भव्य निदर्शने आंदोलन

 जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला भव्य निदर्शने आंदोलन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    हा शेतकरी घनसावंगी तालुक्यातील असून काल जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या असताना घडली. या वेळी घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्ह्यातील २६ तलाठ्यांनी केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यावर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तो शांततेत उभा होता. मात्र, पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत धमकावत, जमिनीवर ढकलून दिले आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

    या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीत नागरिकांना निवेदन देण्याचा हक्क असूनही, पोलिसांकडून शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास अनेकांनी निषेध नोंदवला आहे. "साहेब, शेतकऱ्याची कॉलर धरली, हरकत नाही… गोळ्या नाही घातल्या, त्याबद्दल उपकार मानतो," अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथेला वाचा फोडली आहे.

   या घटनेवर प्रतिक्रिया देताना शेतकरी म्हणाले, "सरकारला आमचं काही देणंघेणं नाही. आम्ही संवैधानिक मार्गाने निवेदन दिलं तरी आमच्यावरच अन्याय. तलाठ्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला, आणि आमच्यावर पोलिसांचा अन्याय – हीच सत्तेची विकृती आहे."या संपूर्ण प्रकारातून केवळ एका शेतकऱ्याचा नव्हे, तर संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान झाला आहे. लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या या घटनेविरोधात एकजुटीने आवाज उठवणे आवश्यक आहे, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे.

   १६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्व शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा पुन्हा एकदा जोरदार आग्रह करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!