घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

मल्टीस्टेट मधील रक्कम परत न मिळाल्याने गेटला फाशी घेऊन आयुष्य संपवल

 सिर सालामत तो पगडी पचास; आत्महत्या हा पर्याय नव्हे- वास्तव न्यूज मराठीचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   महाराष्ट्रातील काही मल्टीस्टेट बँकांचे वाढते घोटाळे आणि ठेवीदारांची फसवणूक यामुळे अनेक कुटुंबांवर दुर्दैवी परिणाम होत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात समोर आली आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेमध्ये आपली ११ लाख रुपयांची ठेवी/खात्यातील अडकलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे शेतकरी सुरेश आत्माराम जाधव (वय अंदाजे ५०, रा. खळेगाव) यांनी बँकेच्या गेटलाच फाशी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

     मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी स्वतःची शेती विकून छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख, असे एकूण १६ लाख रुपये गुंतवले होते. त्यांची मोठी मुलगी विवाह योग्य वयाची झाली होती आणि लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. मात्र, सातत्याने बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली ठेवी/खात्यातील पैसे परत मिळाल्या नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने आणि केलेली टोलवाटोलवी यामुळे ते मानसिक तणावात गेले.

मृत्यूपूर्वी शेवटचा प्रयत्न…

    मंगळवारी रात्री उशिरा जाधव हे आपल्या कुटुंबासोबत गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखेत पोहोचले. मात्र, तेथेही त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. तणावाच्या टोकाला पोहोचलेले जाधव यांनी शेवटी रात्रीच बँकेच्या गेटवर दोरी लावून फाशी घेऊन आत्महत्या केली.

पोलीस तपास सुरू, बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

    घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरात संतापाची लाट उसळली असून बँक अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. छत्रपती मल्टीस्टेट आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकांवरील कारवाईचीही जोरदार मागणी होत आहे.

राजकीय-सामाजिक स्तरावर संताप…

   या घटनेनंतर सहकारी पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे. बँकांवर विश्वास ठेवून ठेवी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊन त्यांना जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

आत्महत्या हा पर्याय नव्हे…

    मराठवाड्यातील काही मल्टीस्टेट घोटाळ्यांमुळे अनेक ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यात ज्ञानराधा मल्टीस्टेट आघाडीवर दिसते. मात्र, 'आत्महत्या' हे या समस्येचे उत्तर नाही. ‘सिर सालामत तो पगडी पचास’ या उक्तीनुसार, जीव वाचला तर संधी राहते, लढाई शक्य होते. आपल्या जीवनाची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.

वास्तव न्यूज मराठीचे आवाहन

   सर्व ठेवीदार आणि खातेदारांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये. आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढा द्या. बँकांवर, प्रशासनावर दबाव टाका, पण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनाशी खेळू नका. पैसे आपल्यासाठी आहे आपण पैशासाठी नव्हे हे विशेष करून लक्षात घेऊ.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या