अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मल्टीस्टेट मधील रक्कम परत न मिळाल्याने गेटला फाशी घेऊन आयुष्य संपवल

 सिर सालामत तो पगडी पचास; आत्महत्या हा पर्याय नव्हे- वास्तव न्यूज मराठीचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   महाराष्ट्रातील काही मल्टीस्टेट बँकांचे वाढते घोटाळे आणि ठेवीदारांची फसवणूक यामुळे अनेक कुटुंबांवर दुर्दैवी परिणाम होत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात समोर आली आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेमध्ये आपली ११ लाख रुपयांची ठेवी/खात्यातील अडकलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे शेतकरी सुरेश आत्माराम जाधव (वय अंदाजे ५०, रा. खळेगाव) यांनी बँकेच्या गेटलाच फाशी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

     मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी स्वतःची शेती विकून छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख, असे एकूण १६ लाख रुपये गुंतवले होते. त्यांची मोठी मुलगी विवाह योग्य वयाची झाली होती आणि लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. मात्र, सातत्याने बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली ठेवी/खात्यातील पैसे परत मिळाल्या नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने आणि केलेली टोलवाटोलवी यामुळे ते मानसिक तणावात गेले.

मृत्यूपूर्वी शेवटचा प्रयत्न…

    मंगळवारी रात्री उशिरा जाधव हे आपल्या कुटुंबासोबत गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखेत पोहोचले. मात्र, तेथेही त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. तणावाच्या टोकाला पोहोचलेले जाधव यांनी शेवटी रात्रीच बँकेच्या गेटवर दोरी लावून फाशी घेऊन आत्महत्या केली.

पोलीस तपास सुरू, बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

    घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरात संतापाची लाट उसळली असून बँक अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. छत्रपती मल्टीस्टेट आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकांवरील कारवाईचीही जोरदार मागणी होत आहे.

राजकीय-सामाजिक स्तरावर संताप…

   या घटनेनंतर सहकारी पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे. बँकांवर विश्वास ठेवून ठेवी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊन त्यांना जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

आत्महत्या हा पर्याय नव्हे…

    मराठवाड्यातील काही मल्टीस्टेट घोटाळ्यांमुळे अनेक ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यात ज्ञानराधा मल्टीस्टेट आघाडीवर दिसते. मात्र, 'आत्महत्या' हे या समस्येचे उत्तर नाही. ‘सिर सालामत तो पगडी पचास’ या उक्तीनुसार, जीव वाचला तर संधी राहते, लढाई शक्य होते. आपल्या जीवनाची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.

वास्तव न्यूज मराठीचे आवाहन

   सर्व ठेवीदार आणि खातेदारांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये. आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढा द्या. बँकांवर, प्रशासनावर दबाव टाका, पण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनाशी खेळू नका. पैसे आपल्यासाठी आहे आपण पैशासाठी नव्हे हे विशेष करून लक्षात घेऊ.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या