घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
गावकरी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या हद्दीत विविध प्रकारचे नशेचे पदार्थ – देशी दारू, बनावट मद्य, तसंच अन्य व्यसनी घटकांची बिनधास्त विक्री सुरू होती. या समस्येमुळे गावातील सुमारे 25 ते 30 युवक व्यसनाधीन झाले असून, यामध्ये 10 ते 15 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गोष्टीमुळे गावाची सामाजिक शिस्त, शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
दारूबंदीच्या निर्णयानंतर गावातील काही दुकानदारांनी समाजहितासाठी स्वतःहून दारू विक्री थांबवली आहे. गावात आता नशामुक्तीच्या दिशेने एकजूट दिसत आहे.
या संपूर्ण मोहिमेत महिलांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत सादर केला आणि तो एकमताने मंजूर करून घेतला. ग्रामसेवक, सरपंच मनिषा घोगरे, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि युवावर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, मच्छिंद्रनाथ चिंचोली गावाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या नशेच्या पदार्थांची विक्री होऊ नये, तसेच या गोष्टीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी आणि गावाला नशामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
नुसती कागदावरच दारू बंदी करू नका
ReplyDelete