ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात हृदयद्रावक घटना-विजेचा धक्का लागून शेतकरी व दोन चिमुकल्यांचा मृत्यू

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालन्यात आज मंगळवारी वटसावित्रीच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर येत असून विजेचा धक्का लागून शेतात शेतकरी व दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय.

    जालना तालुक्यातील वरुड गावात वटसावित्रीच्या दिवशी घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेतीकाम करत असताना विजेचा धक्का बसून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे विनोद तुकाराम मस्के (वडील), श्रद्धा मस्के (वय ७) आणि समर्थ मस्के (वय ५) अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विनोद मस्के हे आपल्या शेतात मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम करत असताना, शेतातून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे त्यांना जोरदार विजेचा शॉक बसला. या घटनेची तीव्रता इतकी होती की, त्याचवेळी जवळ उभे असलेली त्यांची दोन चिमुकली मुलेही या शॉकच्या संपर्कात आली आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

    ही दुर्घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ सर्वांना उपचारासाठी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

    पावसाळ्यापूर्वीच्या शेती हंगामात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात चिंता आणि भीतीचं वातावरण आहे. गावातील नागरिक व ग्रामस्थांनी या दुर्घटनेने व्यथित होऊन शोक व्यक्त केला आहे. दुर्घटना घडल्याच्या दिवशीच वटसावित्री असल्याने महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरलेला असतो, मात्र या दिवशीच एका कुटुंबाचा संपूर्ण आधार हिरावून गेला, ही बाब अधिक वेदनादायी ठरत आहे.

   प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, विद्युत तारा, कनेक्शन आणि शेतातील सुरक्षेच्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. या दुर्घटनेने वरुडसह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

  1. Mseb permanent staff terminated immediately

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!