ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना तालुक्यातील वरुड गावात वटसावित्रीच्या दिवशी घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेतीकाम करत असताना विजेचा धक्का बसून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे विनोद तुकाराम मस्के (वडील), श्रद्धा मस्के (वय ७) आणि समर्थ मस्के (वय ५) अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विनोद मस्के हे आपल्या शेतात मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम करत असताना, शेतातून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे त्यांना जोरदार विजेचा शॉक बसला. या घटनेची तीव्रता इतकी होती की, त्याचवेळी जवळ उभे असलेली त्यांची दोन चिमुकली मुलेही या शॉकच्या संपर्कात आली आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
ही दुर्घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ सर्वांना उपचारासाठी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
पावसाळ्यापूर्वीच्या शेती हंगामात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात चिंता आणि भीतीचं वातावरण आहे. गावातील नागरिक व ग्रामस्थांनी या दुर्घटनेने व्यथित होऊन शोक व्यक्त केला आहे. दुर्घटना घडल्याच्या दिवशीच वटसावित्री असल्याने महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरलेला असतो, मात्र या दिवशीच एका कुटुंबाचा संपूर्ण आधार हिरावून गेला, ही बाब अधिक वेदनादायी ठरत आहे.
प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, विद्युत तारा, कनेक्शन आणि शेतातील सुरक्षेच्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. या दुर्घटनेने वरुडसह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mseb permanent staff terminated immediately
ReplyDelete