घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी तालुक्यात भरदिवसा तीन गावांत घरफोडीचा धुमाकूळ - साडे आठ लाखाचा ऐवज लंपास !

 मुरमा, मच्छिंद्रनाथ चिंचोली, पडोळी तीन गावांत घरफोडी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      घनसावंगी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गडद होत आहे. अवघ्या दोन दिवसांत पाडूळी खुर्द, मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि मुरमा या तीन गावांमध्ये भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनांनी परिसरात खळबळ उडवून दिली आहे. या तिन्ही घटनांमध्ये एकूण जवळपास साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

पाडूळी खुर्द: चाकूचा धाक दाखवत ३१ हजारांची रोकड लंपास

    २१ मे रोजी दुपारी पाडूळी खुर्द येथे संभाजी नाईक यांच्या घरी घडलेल्या घटनेत वैष्णवी नाईक या घरात एकट्या होत्या. दोन चोरट्यांनी लाकडी टॉमीने दरवाजा तोडून प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवत ३१,००० रुपयांची रोकड लंपास केली. वैष्णवी नाईक यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्रनाथ चिंचोली: शेतात गेलेल्या कुटुंबाच्या घरातून साडेतीन लाखांची चोरी

     त्याच दिवशी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे परमेश्वर तेलंग यांचे कुटुंब शेतात असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५०,००० रुपये रोख व तीन तोळे सोनं असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना दुपारी २ ते ३ च्या सुमारास घडली असून, सायंकाळी कुटुंब घरी परतल्यावर प्रकार उघडकीस आला.

मुरमा गावात पाच लाखांची चोरी- चोरटे दुचाकीवरून आले !

   २२ मे रोजी गुरुवारी दुपारी मुरमा गावात विक्रम शिवाजी गपाट व विकास शिवाजी गपाट यांच्या घरी अज्ञात तिघा चोरट्यांनी धाडसी चोरी केली. गपाट कुटुंबीय बाहेरगावी असताना चोरट्यांनी घराची रेकी करून कुलूप तोडले आणि पाच ते साडेपाच लाखांचा ऐवज, ज्यात रोख रक्कम व सोनं-चांदीचे दागिने होते, असा ऐवज लंपास केला अशी माहिती मिळाली. चोरटे दुचाकीवरून आले होते व घरात कोणी नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी बेधडक प्रवेश केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिघे अज्ञात चोरटे दुचाकीवरून मुरमा येथे आले. त्यांनी थेट विक्रम शिवाजी गपाट व विकास शिवाजी गपाट यांच्या घरासमोर दुचाकी उभी करून घराची रेकी केली. शेजारील एका मुलीकडून घरात कोणीही नसल्याची माहिती मिळाल्यानंतर, चोरट्यांनी निर्धास्तपणे घरात प्रवेश करून चोरी केली. या वेळी शिवाजी गापट आठवडी बाजारासाठी तीर्थपुरीला गेले होते, तर विक्रम व विकास गपाट हे नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी होते. त्यांच्या अनुपस्थितीतच ही धाडसी चोरी करण्यात आली.

      विशेष म्हणजे, तीर्थपुरी येथे पोलीस ठाणे स्थापन झाल्यापासून परिसरात अवैध धंदे फोफावले असून चोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवर कोणताही वचक राहिलेला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. पोलीस ठाण्याचे अस्तित्व फक्त नावापुरतेच राहिले आहे व पोलिस ठाण्याची भूमिका केवळ शोभेपुरती उरल्याची भावना आता चोरी झालेल्या गावातील ग्रामस्थांमध्ये बळावत आहे. घटनास्थळी तीर्थपुरी पोलिसांनी भेट दिली असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

नागरिकांची मागणी – कडक कारवाई करा

सततच्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या