अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी- चाकूचा धाक दाखवत भरदिवसा ३१ हजारांची रोकड लंपास ! दोन ठिकाणी चोरीच्या घटना

घरफोडीचा चोरट्यांकडून धुमाकूळ 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

    घनसावंगी तालुक्यात बुधवारी चोरट्यांनी भरदिवसा दोन वेगवेगळ्या गावांमध्ये घरफोडीच्या घटना घडवून घनसावंगी परिसरात दहशत निर्माण केली. पाडूळी खुर्द आणि मच्छिंद्रनाथ चिंचोली या गावांमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाडूळी खुर्दमध्ये चाकूचा धाक दाखवत ३१ हजारांची रोकड चोरी

     पाडूळी खुर्द येथील रहिवासी संभाजी नाईक यांच्या घरी ही घटना दुपारी साधारण 2.30 वाजता घडली. त्या वेळी त्यांच्या पत्नी वैष्णवी नाईक (वय 21) या घरात एकट्या होत्या. त्या विश्रांती घेत असतानाच दोन अज्ञात चोरट्यांनी टॉमीच्या सहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम मागितली. वैष्णवी नाईक घाबरून दुसऱ्या खोलीत पळून गेल्या आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले.

    दरम्यान, चोरट्यांनी पलंगाच्या गादीखाली आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली एकूण ३१,000/- रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. यामध्ये ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.

मच्छिंद्रनाथ चिंचोलीतही चोरीची घटना

     याच दिवशी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील प्रमोद तेलंग यांच्या घरी देखील चोरीची घटना घडल्याचे समजते. घरात शिरण्याची पद्धत, भरदिवसा चोरी केल्याच्या घटनांमुळे हे चोरटे एकाच टोळीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.


पोलिसांचा तपास सुरू

    या प्रकरणी घनसावंगी पोलीस स्टेशन येथे सायंकाळी वैष्णवी नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

     घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी व गुन्हेगारांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

   या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. भरदिवसा, घरात महिला एकट्या असताना चोरट्यांचा असा मुक्त संचार होणे ही चिंतेची बाब असून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून गुन्हेगारांना गजाआड करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या