घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

घनसावंगी - शेतवस्तीवर भीषण चोरी व पती-पत्नीवर अमानुष हल्ला: पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

 २० दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील एका शेतवस्तीवर ३ मे रोजी रात्री सुमारास घडलेल्या भीषण चोरी व पती-पत्नीवर अमानुष हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय बिबनभाई बापूजी पठाण यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांनी आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

      ही घटना १ मेच्या मध्यरात्री घडली. बिबनभाई पठाण आणि त्यांची पत्नी सलीमाबी पठाण हे खापरदेव हिवरा-सिद्धेश्वर पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात वस्ती करून राहत होते. त्या रात्री सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश करून त्यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. चोरट्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, सलीमाबी पठाण यांच्या हातावरील तीन बोटे धारदार शस्त्राने तोडल्याने परिसरात खळबळ उडाली.

    हल्लेखोरांनी गळ्यातील व कानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि अंदाजे एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. हल्ल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळले. सकाळी नऊ वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तत्काळ घनसावंगी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, त्यानंतर बिबनभाई पठाण यांना गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

   या सदरील घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, याचा तपास पोलिसांना लागला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल संतापाची लाट उसळली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या