अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना जिल्ह्यात वादळ, वीज आणि पावसाचा यलो अलर्ट

 जालना जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना दक्षतेचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 22 मे ते 26 मे 2025 या कालावधीत वादळ, विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

    22 व 23 मे 2025 रोजी जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मे 2025 दरम्यानही अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

   या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

1. वादळी वारे व विजेच्या वेळेस झाडाखाली थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.

2. विजेच्या वेळेस विद्युत उपकरणे वापरणे टाळा, तसेच ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल यापासून दूर राहा.

3. मोकळ्या जागा, विद्युत खांब, धातूची कुंपणं, टॉवर्स यापासून दूर राहा.

4. जर मोकळ्या जागेत असाल, तर गुडघ्यावर बसून कान झाका व डोके गुडघ्यात ठेवा, जमिनीशी संपर्क कमी ठेवा.

5. शेतकरी बांधवांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

6. बाजार समितीत माल आणताना नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.

7. जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

    नागरिकांनी व जनावरांनी वादळी वाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करावा आणि आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष 02482-223132 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 तसेच स्थानिक तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गणेश महाडीक, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या