घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जालना जिल्ह्यात वादळ, वीज आणि पावसाचा यलो अलर्ट

 जालना जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना दक्षतेचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 22 मे ते 26 मे 2025 या कालावधीत वादळ, विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

    22 व 23 मे 2025 रोजी जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मे 2025 दरम्यानही अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

   या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

1. वादळी वारे व विजेच्या वेळेस झाडाखाली थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.

2. विजेच्या वेळेस विद्युत उपकरणे वापरणे टाळा, तसेच ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल यापासून दूर राहा.

3. मोकळ्या जागा, विद्युत खांब, धातूची कुंपणं, टॉवर्स यापासून दूर राहा.

4. जर मोकळ्या जागेत असाल, तर गुडघ्यावर बसून कान झाका व डोके गुडघ्यात ठेवा, जमिनीशी संपर्क कमी ठेवा.

5. शेतकरी बांधवांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

6. बाजार समितीत माल आणताना नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.

7. जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

    नागरिकांनी व जनावरांनी वादळी वाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करावा आणि आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष 02482-223132 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 तसेच स्थानिक तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गणेश महाडीक, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या