घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना जिल्ह्यात वादळ, वीज आणि पावसाचा यलो अलर्ट

 जालना जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना दक्षतेचे आवाहन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 22 मे ते 26 मे 2025 या कालावधीत वादळ, विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

    22 व 23 मे 2025 रोजी जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मे 2025 दरम्यानही अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

   या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

1. वादळी वारे व विजेच्या वेळेस झाडाखाली थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.

2. विजेच्या वेळेस विद्युत उपकरणे वापरणे टाळा, तसेच ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल यापासून दूर राहा.

3. मोकळ्या जागा, विद्युत खांब, धातूची कुंपणं, टॉवर्स यापासून दूर राहा.

4. जर मोकळ्या जागेत असाल, तर गुडघ्यावर बसून कान झाका व डोके गुडघ्यात ठेवा, जमिनीशी संपर्क कमी ठेवा.

5. शेतकरी बांधवांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

6. बाजार समितीत माल आणताना नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.

7. जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

    नागरिकांनी व जनावरांनी वादळी वाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करावा आणि आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष 02482-223132 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 तसेच स्थानिक तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गणेश महाडीक, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या