घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा कहर: पिके पाण्याखाली भयानक छायाचित्रे

 वाऱ्यामुळे पिके आडवी: शेताला आले तळ्याचे स्वरूप- भयावह परिस्थिती 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यात काल (२१ मे) रात्री वादळी वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. तीर्थपुरी व परिसरातील मुरमा, कंडारी, अंतरवाली टेंभी, खलापुरी, खाडका, लिंबोणी, रामसगाव, जोगलादेवी, शेवता, लिंगसेवाडी, बानेगव, भोगावं, मंगरुळ, कोठी, मुद्रेगाव, दहिगव्हण, भायगव्हाण, एकरुखा, राहेरा, तनवाडी, खापरदेव हिवरा, दैठना, भणंग जळगाव, एकलहरा सह तालुक्यातील गावांमध्ये मुसळधार पावसाने आणि वाऱ्याच्या तडाख्याने शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

     वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, घरांची पत्रे उडून गेली, वीज पुरवठा खंडित झाला, ओढे-नाले ओव्हरफ्लो झाले. काही भागांत वीज कोसळल्याने जनावरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. परिणामी अनेक रस्ते अडगळीने बंद झाले आणि गावांमधील संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण झाली.

     शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. ऊस, बाजरी, मका, डाळिंब, केळी, मोसंबी या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही पिके आडवी गेली आहेत, तर काही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतीतील माती वाहून गेल्याने जमीन खराब झाली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

      गेल्या आठवड्यापासून सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे. नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकरी आपली इलेक्ट्रिक मोटारी, पंपसेट्स, खतांची पोती आणि इतर शेती साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत.

      या संकटकाळात सरकारकडून त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. अनेक शेतकरी संकटात असून, त्यांच्या डोळ्यांतून मदतीची अपेक्षा स्पष्ट दिसत आहे.

     दरम्यान, या निसर्गसर्जित आपत्तीत एक सकारात्मक बाब म्हणजे जमिनीत आवश्यक ती आर्द्रता निर्माण झाल्याने खरिप हंगामाच्या मशागतीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    शेतकऱ्यांसाठी हा काळ कसोटीचा ठरत असला तरी प्रशासनाच्या त्वरित मदतीने त्यांच्यावरचं संकट काही अंशी तरी हलकं होऊ शकतं.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या