घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

श्रेयवादावर निसर्गाचा पडदा: घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाने गोदावरीला तूर्तास जीवनदान परंतु शेती व जनावरांचे नुकसान

 गोदावरी नदीत पाणी सोडण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले.. पाणी नदीत पोहोचण्या आधीच निसर्गाने ते हिरावून घेतले ?


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

    अंबड घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीत पाणी सोडण्याच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची चुरस रंगली होती. सोशल मीडियावर पाण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत पोस्टांच्या फैरी झडत होत्या. मात्र, नियोजित पाणी नदीत पोहोचण्याआधीच निसर्गाने स्वतः हस्तक्षेप करत, अवकाळी व जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला भरभरून पाणी दिले. यामुळे राजकीय श्रेयवादावर निसर्गानेच पडदा टाकल्याचे चित्र तयार झाले आहे.

    मागील आठवड्यापासून तालुक्यात अनेक भागांत मुसळधार अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. परिणामी गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी आपली इलेक्ट्रिक मोटारी, पंपसेट्स, व शेतीसाठी आवश्यक साहित्य पाण्यापासून वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत.

विजेचा तडाखा, जनावरांचा मृत्यू

काही भागांत वीज कोसळून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय घरावरील पत्रे, शेतातील शेड्स उडून गेले असून, मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अनेक रस्ते बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगदी पिकांचे मोठे नुकसान

    तालुक्याच्या विविध भागांमध्ये ऊस, केळी, डाळिंब, मोसंबी यांसारख्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडले असून, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेल्याने जमीनही खराब झाली आहे.

शेती मशागतीस फायदेशीर बाजू

    या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बाजूही दिसून आली आहे. खरिपाच्या हंगामासाठी आवश्यक असलेली आर्द्रता या पावसामुळे निर्माण झाली असून, काही शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच शेतीस पोषक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा

    निसर्गाच्या या अनपेक्षित आगमनामुळे एकीकडे गोदावरीला नैसर्गिकरित्या पाणी मिळाले असले, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्ग व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

    अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीत पाणी सोडण्याच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची चुरस रंगली होती. यात आमदार डॉ हिकमत उढाण, माजी आमदार राजेश टोपे, भाजपाचे सतीश घाडगे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पाण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत पोस्टच्या फैरी झडत होत्या. 
    यात विशेष म्हणजे काहीच्या गेल्या दीड महिन्यात चक्क दोन - तीन वेळा पोस्ट व व्हिडिओ झळकले मात्र, नियोजित पाणी नदीत पोहोचण्याआधीच निसर्गाने स्वतः हस्तक्षेप करत, अवकाळी व जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला भरभरून पाणी दिले असेच दिसून आले.

   एकूणच परिस्थिती ही निसर्गाच्या दयेवर अवलंबून असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राजकीय श्रेयवादाच्या वादात न अडकता, प्रत्यक्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे खरे श्रेय कोण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या