अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

श्रेयवादावर निसर्गाचा पडदा: घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाने गोदावरीला तूर्तास जीवनदान परंतु शेती व जनावरांचे नुकसान

 गोदावरी नदीत पाणी सोडण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले.. पाणी नदीत पोहोचण्या आधीच निसर्गाने ते हिरावून घेतले ?


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

    अंबड घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीत पाणी सोडण्याच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची चुरस रंगली होती. सोशल मीडियावर पाण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत पोस्टांच्या फैरी झडत होत्या. मात्र, नियोजित पाणी नदीत पोहोचण्याआधीच निसर्गाने स्वतः हस्तक्षेप करत, अवकाळी व जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला भरभरून पाणी दिले. यामुळे राजकीय श्रेयवादावर निसर्गानेच पडदा टाकल्याचे चित्र तयार झाले आहे.

    मागील आठवड्यापासून तालुक्यात अनेक भागांत मुसळधार अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. परिणामी गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी आपली इलेक्ट्रिक मोटारी, पंपसेट्स, व शेतीसाठी आवश्यक साहित्य पाण्यापासून वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत.

विजेचा तडाखा, जनावरांचा मृत्यू

काही भागांत वीज कोसळून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय घरावरील पत्रे, शेतातील शेड्स उडून गेले असून, मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अनेक रस्ते बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगदी पिकांचे मोठे नुकसान

    तालुक्याच्या विविध भागांमध्ये ऊस, केळी, डाळिंब, मोसंबी यांसारख्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडले असून, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेल्याने जमीनही खराब झाली आहे.

शेती मशागतीस फायदेशीर बाजू

    या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बाजूही दिसून आली आहे. खरिपाच्या हंगामासाठी आवश्यक असलेली आर्द्रता या पावसामुळे निर्माण झाली असून, काही शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच शेतीस पोषक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा

    निसर्गाच्या या अनपेक्षित आगमनामुळे एकीकडे गोदावरीला नैसर्गिकरित्या पाणी मिळाले असले, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्ग व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

    अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीत पाणी सोडण्याच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची चुरस रंगली होती. यात आमदार डॉ हिकमत उढाण, माजी आमदार राजेश टोपे, भाजपाचे सतीश घाडगे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पाण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत पोस्टच्या फैरी झडत होत्या. 
    यात विशेष म्हणजे काहीच्या गेल्या दीड महिन्यात चक्क दोन - तीन वेळा पोस्ट व व्हिडिओ झळकले मात्र, नियोजित पाणी नदीत पोहोचण्याआधीच निसर्गाने स्वतः हस्तक्षेप करत, अवकाळी व जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला भरभरून पाणी दिले असेच दिसून आले.

   एकूणच परिस्थिती ही निसर्गाच्या दयेवर अवलंबून असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राजकीय श्रेयवादाच्या वादात न अडकता, प्रत्यक्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे खरे श्रेय कोण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या