घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

घनसावंगी तालुक्यात २० कोटींचा शासकीय अनुदान गैरव्यवहार?

 युवा शेतकरी संघर्ष समितीचे 'भिक मागो' आंदोलन 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका सहन करत आहेत. सन २०२० पासून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, गारपीट, तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकांचे पीक उत्पादन पूर्णतः बुडाले आहे. शासनाने अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ अद्यापही मिळालेला नाही.


     यासंदर्भात युवा शेतकरी संघर्ष समिती, घनसावंगी यांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांचा लॉगिन आयडी वापरून तसेच बनावट VK क्रमांक तयार करून सुमारे २० कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

 तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी संगनमताने अपात्र खात्यांवर रक्कम जमा करून फसवणूक केली. या व्यवहारामुळे अनेक पात्र शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. याप्रकरणी अनेक वेळा आंदोलने, निवेदने, मोर्चे व आमरण उपोषण करूनही प्रशासनाने दुर्लक्षच केल्याने संघर्ष समितीने 'भिक मागो' आंदोलनाचे हत्यार उचलले.

    या आंदोलनात बाजारपेठेतून शेतकऱ्यांनी भिक मागून 180 रुपये जमा केले व ती रक्कम तहसील कार्यालयात रिकाम्या खुर्चीला अर्पण करून नायब तहसीलदार तोतला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

    यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती मेहत्रेवार यांच्याशी फोनवर चर्चा करताना समितीच्या वतीने सूचित करण्यात आले की, जे शेतकरी अद्याप VK नंबरपासून वंचित आहेत, त्यांना त्वरित नंबर देऊन अनुदान वितरित करावे, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

    संघर्ष समितीने मागणी केली आहे की, २०२० पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान योजनांची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई व्हावी, वसूल झालेली रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, तसेच 'भिक मागो' आंदोलनातून जमा झालेली रक्कम स्वीकारण्यात यावी. अशा मागण्या केल्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या