अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

भीषण अपघातात मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल दैठणा- माळसोन्ना रस्त्यावर भीषण अपघात; गावात शोककळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   एका भीषण झालेल्या अपघातात मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील दैठणा- माळसोन्ना रोडवर गुरुवारी (दि. १७) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोरवड येथील प्रल्हाद उद्धवराव गिराम (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यात त्यांची बहीण कल्पना पांडुरंग धोंडगे व दोन भाचे गंभीर जखमी झाले होते. त्यातील माऊली पांडुरंग धोंडगे (वय ६) या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

     प्रल्हाद गिराम हे आपल्या बहिणीसह भाच्यांना एस.टी. बसमध्ये बसवण्यासाठी दुचाकीवरून पोखर्णीकडे जात होते. त्यावेळी माळसोन्नाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्पर (क्र. एमएच ४० सीडी ४५९८) ने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रल्हाद गिराम हे जागीच ठार झाले तर त्यांची बहीण कल्पना व भाचे ध्रुवा व माऊली हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच पोरवड येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना तत्काळ परभणी येथे खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र माऊली धोंडगे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

     दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टिप्परवर दगडफेक केली व त्यास जाळण्याचा प्रयत्न केला. या वेळी दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांनी ट्रकवर उभे राहून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी वेळीच हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणली.

     या प्रकरणी गणपती गिराम यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक आकाश गायकवाड याच्याविरोधात दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या